Posts

...आणि तोरणा सर केला!

Image
दरवर्षी मी आणि निहार अशी एक खास ट्रिप काढतो. फक्त आम्ही दोघे. बाप आणि मुलगा. या प्रवासात तिसऱ्या कुणालाही जागा नसते. ही कल्पना खरं तर मागच्या वर्षी स्वातीनेच दिली. तिला एकटीला सोडून जाणं आम्हा दोघांनाही पटत नव्हतं, पण तिचा आग्रह आम्ही मान्य केला… आणि त्या एका निर्णयाने मी आणि निहार अधीक जवळ आलो.  पत्रकारितेत आलो आणि कामाच्या व्यापात इतका गुरफटलो की, कुटुंबासाठी वेळ देणं मागे पडलं. निहारचं बालपण कधी निसटून गेलं, ते कळलंच नाही. आता तो मोठा झाला… आणि खरंच, बापाच्या चपला मुलाच्या पायात बसायला लागल्या की नातं आपोआप मित्राचं होतं, हे अनुभवायला मिळायला लागलं. मागच्या वर्षी आम्ही पुणे, रायगड, सातारा, प्रतापगड असा प्रवास केला. यंदा निहार दहावीला गेला. पुढचं वर्ष अभ्यासात जाणार, म्हणून हा छोटासा ब्रेक हवाच होता. यावेळी आम्ही ठरवलं, राजगड, तोरणा आणि वाई! फक्त तीन दिवस, त्यात एवढं मोठं लक्ष्य… थोडं कठीण वाटत होतं. पण निहारचा उत्साह माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होता. आमच्यात एक गोष्ट मात्र कॉमन आहे; भटकंती आणि गड-किल्ल्यांची ओढ! सुरुवात केली वाईपासून. मंदिरांचं शहर… शांत, सुंदर आणि आपुलकीचं...

मना सज्जना- आजचा दिवस जसा आहे तसा स्वीकारा

Image
आजचा दिवस कसा आहे. याचा आपण फारसा विचार करत नाही. आपण सतत पुढचाच विचार करतो. उद्या काय होणार. पुढे काय बदलायचं. आणखी काय सुधारायचं. आजचा दिवस मात्र मध्येच कुठेतरी हरवतो. आज बरं वाटत नसेल. तर आपण स्वतःवर चिडतो. आज काही जमलं नसेल. तर स्वतःला दोष देतो. आज उत्साह नसेल. तर वाटतं, “माझ्यात काहीतरी बिनसलंय.” पण प्रत्येक दिवस सारखा असायलाच हवा का. प्रत्येक दिवस उत्साहीच असावा का. प्रत्येक दिवस अर्थपूर्णच असावा का. आजचा दिवस जसा आहे. तसाच तो स्वीकारणं. हे सोपं वाटतं. पण प्रत्यक्षात खूप अवघड असतं. कारण स्वीकार म्हणजे हार नाही. तो पलायन नाही. तो आळशीपणा नाही. स्वीकार म्हणजे वास्तवाशी शांतपणे उभं राहणं. आज थकवा आहे. हे मान्य करणं. आज गोंधळ आहे. हे कबूल करणं. आज मन शांत नाही. हे स्वीकारणं. यात कुठेही कमकुवतपणा नाही. आपण आजचा दिवस नाकारतो. म्हणून मनाशी झगडतो. आणि झगडत झगडत. आपण स्वतःपासून दूर जातो. आजचा दिवस जसा आहे. तसा स्वीकारला. की मनावरचा ताण थोडा सुटतो. “मला आज असंच वाटतंय.” एवढं स्वतःला सांगता आलं. की मनाला थोडा श्वास मिळतो. स्वीकार म्हणजे समाधान नाही. स्वीकार म...

मना सज्जना- खोट्या आकर्षणाला मन का भुलतं?

Image
कधी कधी एक प्रश्न मनात उभा राहतो. इतकी वर्षं जगलेला माणूस. अनुभव घेतलेले स्त्री-पुरुष. तरीही कुणाच्या खोट्या बोलण्याला. खोट्या कौतुकाला. शो-ऑफला. आपण इतकं सहज का भुलतो. आपल्याला आतून माहीती असतं. हे खरं नाही. हे नाटक आहे. हे बोलणं पोकळ आहे. तरीही मन तिकडे ओढलं जातं. आणि जे लोक सरळ बोलतात. जे स्पष्ट भूमिका घेतात. जे समोरासमोर खरं सांगतात. ते मात्र त्रासदायक वाटतात. “फार तोंडावर बोलतात.” “फार कडक आहेत.” “फार स्पष्ट आहेत.” असं आपण म्हणतो. मग प्रश्न पडतो. मन इतकं कमकुवत असतं का. की सत्य सहन होत नाही. आणि खोटं गोड वाटतं. खरं तर हे कमकुवतपणाचं नाही. हे असुरक्षिततेचं लक्षण असतं. जिथे मनाला सतत मान्यतेची भूक असते. कौतुक हवं असतं. कोणी तरी “तू खास आहेस” असं म्हणावं अशी अपेक्षा असते. आणि ही भूक. खोटं बोलणारे लोक अचूक ओळखतात. ते मुद्दाम गोड बोलतात. मुद्दाम कौतुक करतात. मुद्दाम वेगळं भासवतात. हे खरं आहे हे त्यांनाही माहीत नसतं. पण ते परिणामकारक आहे हे त्यांना माहीत असतं. अशा लोकांचा प्रभाव सगळ्यांवर नसतो. तो एका ठराविक समूहावर असतो. ज्यांना स्वतःबद्दल शंका असते. ज्य...

मना सज्जना- किती पळणार सुखासाठी?

Image
सुखासाठीची वणवण थांबवा आपण सुख शोधायला फार लांब जातो. मोठ्या गोष्टींत. मोठ्या यशांत. मोठ्या बदलांत. पण सुख अनेकदा अगदी जवळ असतं. इतकं जवळ की ते साधं वाटतं. आणि म्हणूनच आपण त्याकडे पाहत नाही. साधेपणाला आपण कमी लेखतो. कारण ते गाजत नाही. ते दाखवता येत नाही. ते कौतुक मिळवून देत नाही. पण मनाला शांत ठेवण्याचं काम मात्र तेच करतं. सकाळची निवांत चहा प्यायची वेळ. घाई नसलेला एखादा क्षण. कोणतीही अपेक्षा न ठेवता झालेलं संभाषण. या गोष्टी फार लहान वाटतात. पण त्याच क्षणांत मन सावरत असतं. आपण आयुष्य फार गुंतागुंतीचं करून टाकतो. प्रत्येक गोष्टीला अर्थ द्यायचा. प्रत्येक क्षण उपयोगी ठरवायचा. पण साधेपणात उपयोग नसतो. तिथे फक्त अनुभव असतो. साधेपणात सुख असतं. कारण तिथे तुलना नसते. दडपण नसतं. दिखावा नसतो. आपण जसे आहोत तसे असू शकतो. हीच त्याची खरी ताकद आहे. आपण अनेकदा असं म्हणतो. “आयुष्य फार कठीण झालंय.” पण त्यातली अडचण बहुतेक वेळा गरजेपेक्षा जास्त गोष्टी उचलण्यात असते. जे कमी करता येईल. ते कमी केलं. की मन हलकं होतं. साधेपणा म्हणजे मागे जाणं नाही. तो निवड असते. काय सोडायचं आणि काय ...

मना सज्जना- आपल्याकडे जे आहे, त्याची जाणीव झाली की मन समृद्ध होतं

Image
आपण नेहमी पुढे पाहतो. आपल्याकडे काय नाही, याची यादी पटकन तयार होते. अजून चांगली नोकरी हवी. अजून पैसा हवा. अजून मान मिळायला हवा. आणि या सगळ्या “अजून”च्या धावपळीत. आपल्याकडे आधीच काय आहे, हे नजरेआड होतं. कृतज्ञता म्हणजे समाधानी राहणं नाही. ती म्हणजे वास्तव ओळखणं. आज सगळं परिपूर्ण नाही. पण आज सगळंच अपूर्णही नाही. ही जाणीव मनाला स्थिर करते. आपण सकाळी उठतो. श्वास घेतो. दिवस सुरू होतो. हे सगळं इतकं सवयीचं झालंय. की त्याचं महत्त्वच उरत नाही. पण कधी एखादी गोष्ट अडखळली. तेव्हा लक्षात येतं. या साध्या गोष्टीच किती मौल्यवान आहेत. कृतज्ञता मोठ्या गोष्टींसाठी नसते. ती लहान क्षणांत दडलेली असते. वेळेवर मिळालेला फोन. कोणीतरी शांतपणे ऐकून घेतलेला क्षण. दिवसाच्या शेवटी मिळालेली थोडी शांतता. हे सगळं मनाला आधार देतं. आपण कृतज्ञ राहिलो. की तक्रारी कमी होतात. मत्सर कमी होतो. आणि तुलना थोडी थांबते. कारण मन म्हणतं. “आज जे आहे, ते पुरेसं आहे.” याचा अर्थ मोठी स्वप्नं सोडायची नाहीत. प्रयत्न थांबवायचे नाहीत. पण प्रयत्न करत असताना. मन रिकामं ठेवायचं नाही. कृतज्ञ माणूस कमी महत्त्वाकांक्षी नसतो. तो फक्त अधिक शहाणा अस...

मना सज्जना- आपण कुणाला काय देतो?

Image
  आपण रोज कुणाकडून तरी काहीतरी अपेक्षा ठेवतो. वेळ. समज. साथ. मदत. कधी फक्त लक्ष. आपल्या गरजा खूप सहजपणे व्यक्त होतात. आपण म्हणतो, “कोणी तरी मदत करायला हवी.” “कोणी तरी समजून घ्यायला हवं.” “कोणी तरी पुढे यायला हवं.” पण हे बोलताना एक प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही. आपण कुणासाठी काय देतोय. देणं म्हटलं की आपल्याला लगेच पैशांची आठवण येते. किंवा मोठ्या मदतीची. पण देणं एवढंच मर्यादित नाही. वेळ देणं. मन देणं. शांतपणे ऐकून घेणं. ही सगळी देणगीच आहे. पण आपण इथे थांबतो. कारण मनात लगेच एक विचार येतो. “यात माझा काय फायदा?” हा प्रश्न नकळत सगळ्या नात्यांत शिरतो. आणि देणं व्यवहार बनतं. फुकटचा सल्ला मात्र आपण सहज देतो. कारण त्यात काही द्यावं लागत नाही. ना वेळ. ना जबाबदारी. ना स्वतःला झुकवावं लागतं. पण खरी मदत. ती थोडी अस्वस्थ करते. कारण त्यात स्वतःपलीकडे पाहावं लागतं. आपण घेताना मात्र फार विचार करत नाही. कोणी वेळ दिला तर चालतो. कोणी साथ दिली तर आवडतं. कोणी मदत केली तर समाधान मिळतं. मग देताना आपण एवढे मोजून का पाहतो. खरं तर देण्यातही तितकाच आनंद असतो. फक्त तो वेगळ्या प्...

मना सज्जना - खोट्या माणसांचं काय करावं?

Image
आपण अनेकदा असं म्हणतो. आजकाल खोट्याची दुनिया आहे. खरं बोलून निभाव लागत नाही. प्रामाणिक राहिलं तर नुकसान होतं. हे ऐकताना खरं वाटतं. कारण आजूबाजूला खोटं वागणारी माणसं दिसतात. दिखावा करणारे यशस्वी दिसतात. आणि खरे राहणारे मागे पडल्यासारखे वाटतात. पण जरा थांबून विचार केला. तर एक प्रश्न उभा राहतो. खऱ्याची दुनिया नाही. म्हणजे खोट्याची दुनिया तरी कुठे आहे. खोटं बोलून. खोटं वागून. खोटं आयुष्य जगून. कोणी खरंच समाधानी असतो का. खोटं यश दिसतं. पण त्यामागचं मन कायम अस्थिर असतं. खोटं हसू दिसतं. पण त्यामागे भीती असते. उद्या खरं उघड होईल का, ही. दुसरे खोटे वागतात. हे सत्य असू शकतं. पण त्यामुळे आपणही खोटे वागायचं. याला काही अर्थ आहे का. आपण खरे राहतो. ते जगासाठी नाही. ते स्वतःसाठी असतं. कारण खोटं जगताना. आपल्यालाच स्वतःची भूमिका लक्षात ठेवावी लागते. खरे राहणारा माणूस. सगळीकडे जिंकतो असं नाही. पण तो स्वतःशी हरत नाही. आणि ही हार. सगळ्यात महाग असते. खोटं वागणं ही परिस्थितीची मजबुरी नसते. ती एक निवड असते. आणि खरे राहणंही. हीसुद्धा एक निवडच असते. आपण खरे राहिलो. तर कदाचित सगळे आपल्या...