मना सज्जना- आजचा दिवस जसा आहे तसा स्वीकारा
आजचा दिवस कसा आहे. याचा आपण फारसा विचार करत नाही. आपण सतत पुढचाच विचार करतो. उद्या काय होणार. पुढे काय बदलायचं. आणखी काय सुधारायचं. आजचा दिवस मात्र मध्येच कुठेतरी हरवतो. आज बरं वाटत नसेल. तर आपण स्वतःवर चिडतो. आज काही जमलं नसेल. तर स्वतःला दोष देतो. आज उत्साह नसेल. तर वाटतं, “माझ्यात काहीतरी बिनसलंय.” पण प्रत्येक दिवस सारखा असायलाच हवा का. प्रत्येक दिवस उत्साहीच असावा का. प्रत्येक दिवस अर्थपूर्णच असावा का. आजचा दिवस जसा आहे. तसाच तो स्वीकारणं. हे सोपं वाटतं. पण प्रत्यक्षात खूप अवघड असतं. कारण स्वीकार म्हणजे हार नाही. तो पलायन नाही. तो आळशीपणा नाही. स्वीकार म्हणजे वास्तवाशी शांतपणे उभं राहणं. आज थकवा आहे. हे मान्य करणं. आज गोंधळ आहे. हे कबूल करणं. आज मन शांत नाही. हे स्वीकारणं. यात कुठेही कमकुवतपणा नाही. आपण आजचा दिवस नाकारतो. म्हणून मनाशी झगडतो. आणि झगडत झगडत. आपण स्वतःपासून दूर जातो. आजचा दिवस जसा आहे. तसा स्वीकारला. की मनावरचा ताण थोडा सुटतो. “मला आज असंच वाटतंय.” एवढं स्वतःला सांगता आलं. की मनाला थोडा श्वास मिळतो. स्वीकार म्हणजे समाधान नाही. स्वीकार म...