नव्या वर्षात नवे शेजारी


एकाच दिवशी, एकाच क्षणी दोन देश स्वतंत्र झाले.  भारत आणि पाकिस्तान. इतिहास समान होता. पण पुढची वाटचाल पूर्णपणे वेगळी ठरली.

भारताने लोकशाही, विकास, विविधतेचा स्वीकार आणि संस्थात्मक बळ या मूल्यांवर आपली पायाभरणी केली. आज भारताला जगात मानाचे स्थान आहे.  एक उदयोन्मुख आर्थिक महासत्ता, तंत्रज्ञानातील नेतृत्व करणारा देश आणि स्थिर लोकशाही व्यवस्था म्हणून भारताकडे पाहिले जाते. 

याउलट, धर्माच्या आधारे स्थापन झालेला पाकिस्तान आज गंभीर अराजकतेच्या गर्तेत अडकलेला दिसतो. राजकीय अस्थिरता, ढासळती अर्थव्यवस्था, अंतर्गत बंडखोरी, दहशतवाद आणि सत्तासंघर्ष यामुळे हा देश जवळजवळ अपयशी राष्ट्राच्या मार्गावर आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की पाकिस्तानी नागरिकांना अनेक मुस्लिम देशांतही संशयाने किंवा नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते.

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. पण हे वर्ष केवळ कॅलेंडर बदलणार नाही, तर दक्षिण आशियातील भूराजकीय नकाशाच बदलू शकते, अशी चिन्हे दिसत आहेत.

पुढील काही महिन्यांत, पाकिस्तानचे तुकडे पडण्याची शक्यता अनेक अभ्यासक आणि विश्लेषक व्यक्त करत आहेत. बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तुनख्वा (अफगाणिस्तानशी जोडला जाणारा नवा प्रदेश) आणि पंजाबअसे चार स्वतंत्र देश उदयास येऊ शकतात.

पाकिस्तानची साथ देणारा बांगलादेशही या अस्थिरतेपासून अलिप्त राहील, असे वाटत नाही. अंतर्गत असंतोष, प्रादेशिक असमतोल आणि राजकीय दबावामुळे बांगलादेशचेही पूर्व बांगलादेश आणि पश्चिम बांगलादेश असे विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इतिहास एक गोष्ट स्पष्ट सांगतो,  केवळ विचारसरणी किंवा धर्म राष्ट्र टिकवत नाही. राष्ट्र टिकते ते समावेशकता, आर्थिक संधी, सामाजिक सलोखा आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळे.

नवीन वर्षात दक्षिण आशियासमोर फक्त नवी आव्हाने नसतील.
कदाचित… नवे शेजारीही असतील.

Comments

Popular posts from this blog

मना सज्जना - स्वतःशी संवाद हरवतो तेव्हा…

मना सज्जना- आनंदाची व्याख्या बदला, जग बदलेल

मना सज्जना- चांगुलपणाचा गोंधळ